Friday 25 April 2014

श्री क्षेत्र भालचंद्र गणेश मंदीर (गणेशखिंड)




या  मंदीराचा उल्लेख गणेश पुराणामध्ये आहे. क्रांतीकारक सेनापती बापट यांच्या भुमीगत काळामध्ये भालचंद्र गणपती मंदिर परिसरामध्ये राहुन इंग्रजाबरॊबर लढा दिला. येथे त्यांचे भुयार आहे. त्यांनी येथे राहुन बॉम्ब तयार केले. त्यांची या गणपतीवर खुप श्रध्दा होती. त्यांना वायुगमनाची ताकद येथेच प्राप्त केली होती. मंदीरामध्ये श्री गणेशखिंड ट्रस्ट कार्यरत आहे.

श्री घोडेश्वरी देवी


नगर औरंगाबादरोड वर घोडेगाव हे एक छोटे गाव. गावच इतिहास फार जुना आहे. साधारणतः १००० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी त्यावेळी गावाचे नाव होते निपाणी वडगाव, गावात पाणी नसल्याने त्यावेळी सर्व साधारण पणे नामकरण झाले असावे. कारण त्यावेळी गावात पाणी नव्हते गावाला पिण्यासाठी पाणी नसल्याने सर्व गावकऱ्यांनी पिण्यासाठी विहीर खांदण्याचे ठरवले .

एक चांगला मुहूर्त पाहूनकामच शुभारंभ ही झाला, त्याकाळी आजच्या सारखी यंत्र सामुग्री नसल्याने टिकाव, फावडे, खोरे, घमेले या साधनाचाच वापर होत आसे अत्यंत कष्टाने १० परस विहीर गावकऱ्यांनी खान्दली तरी विहिरीला एक थेब ही पाणी लागले नाही गावकरी निराश झाले त्यामुळे गावकऱ्यांनी विहिरीच नाद सोडून दिला. काही लोकांनी दुसरीकडे स्थलांतरही केले.

काही दिवसानंतर गावाच्या पूर्वेला असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात राहणाऱ्या एका साधूने गावकऱ्यांना त्या मंदीराजवळ विहीर खांदण्याचे सुचवले आणि तेथे नक्की पाणी लागेल असे सुचवले, त्या नंतर एका शुभ मुहूर्तावर तुळजाभवानी ची पूजा करून विहीर खांदण्यास सुरुवात केली, पाच -सहा पारस विहीर खांदली तरी पाण्याचा थेब लागेना त्यामुळे या ही विहिरीचे काम व्यर्थ जाते कि काय आसे गावाकार्याना वाटू लागले? त्या दिवशी मंगळवारच दिवस होता, विहीर खांदण्याचे काम चालू असतानाच सहा परसाच्या पुढे आचानक चमत्कार झाला, विहीर खणात असतानाच एक आश्वरूपी म्हणजे घोड्याचा आकार असलेली दगडी मुर्ती सापडली, सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला कारण इतक्या खोलवर ही मुर्ती आलीच कशी हा प्रश्न सर्वांना भिडसावत होता सर्व गावकऱ्यांनी ही मुर्ती कडून एका जागेवर ठेवली

अंधार पडल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी निघुन गेले त्या रात्री तत्कालीन गावाच्या पाटलाच्या स्वप्नात देवी आली आणि `मी घोडेश्वरी देवी आहे` माझी प्राणप्रतिष्टा तुळजाभवानी मातेच्या मंदिरात करा, यापुढे गावाला कधीच पाणी कमी पडणार नाही आसे म्हणून देवी अंतर्धान पावली. सकाळी पाटलांनी स्वप्नात पाहिलेला सर्व चमत्कार चावडीवर गावकऱ्यांना सांगितला सर्व गावकऱ्याना खूप आनंद वाटला , एक शुभ मुहूर्त पाहून त्या आश्वरूपी देवीच्या मुर्तीची प्रती स्थापना पुरातन तुळजाभवानी मंदिरत करण्यात केली. त्या दिवशी मोठी यात्राही भरली त्याद्नंतर सर्व गावकरी त्या साधू महाराजांकडे आले आणि म्हणाले महाराज आपण सांगितल्या प्रमाणे आम्ही या मंदिराजवळ विहीर खणली सहा पारस विहीर झाली पण एक थेंबही पाणी लागले नाही, बाबांनी आणखी एक पारस विहीर खांदण्यास सांगितले . दुसऱ्या दिवशी देवीची पूजा करून गावकऱ्यांनी विहीर खांद्ण्यास प्रारंभ केला आणि पाचच फुट खाली खणले आसतानांच अचानक विहिरीला भरपूर पाणी लागले पाणी पिण्यास गोड होते तसेच या विहिरीच्या पाण्याने अनेक त्वचारोग बरे होतात आशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गावकरी खुप आनंदी झाले .

विहिरीतून प्रगट झालेल्या देवीची मुर्ती ही आश्वरुपी, घोड्याच्या आकाराची आसल्याने घोडेश्वरी नाव पडले आणि याच घोडेश्वरी मातेच्या कृपेने गावाला खूप काही पाणी मिळाले व गावाच्या पाण्याच प्रश्न सुटला त्यामुळे गावाचे निपाणी वडगाव या नावाचा अपभ्रंश होऊन घोडेगाव हे नाव रूढ झाले याच देवीच्या करुणे हा भाग सुजलाम सुफलाम झाला, बागायत झाला आणि बाजारही खुप मोठा भरू लागला आणि आत्ता देशभरात ही प्रसिद्ध झाला आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य मुर्ती स्वयंभु आसून कुणीही न घडवता आपोआपच तयार झाली आहे, मंदिरचे बांधकाम हेमाडपंथी आसून बांधकाम केव्हा झाले कुणालाही सांगता येत नाही मंदिर हेमाडपंथी आसून मोठ-मोठ्या दगडात मंदिराचे काम झाले आहे .

देवीचे व गावाचे वैशिष्ट्य
*********************

प्राचीन रुढे परंपरे नुसार गावात तेल्याचा घाना चालत नाही . कुंभाराचे चाक चालत नाही तसेच गावात कुणी घोडे पळत नाही, स्थानिक सोनार व्यवसाय गावात चालत नाही. कुठलाही गुंड, समाज विरोधक काम करणारा ( दादा ) ३ वर्ष पुढे टिकत नाही . यात्रेत गोंधळ करणारा, मारामाऱ्या करणारा पुढची यात्रा बघत नाही, हा इतिहास आहे .

आत्ता नुकतेच गावातील काही उमद्या युवकांनी एकत्र येउन मंदिर जीर्नौधाराचे काम चालू केले आहे गाव ही मोठ्या प्रेमाने त्यांची पाठीशी उभे राहिले आहे, साथ दिली आहे. सुरक्षाभिंतीचे काम पूर्ण होत आले आहे, सभामंडप एक बाजूचे काम पूर्ण झाले आहे आणि दुसऱ्या बाजूचे काम प्रगती पथावर आहे.

श्री सदगुरु मठ, मेहकरी


हे अतिशय जुने देवस्थान आहे. ज्ञानेश्वर महाराज पैठ्णला चालले होते त्यावेळेस सर्व भावंडांनी येथे मुक्काम केला होता. हे पवित्र जाग्रुत स्थान आहे. या देवस्थानामध्ये अनेक संत-महात्मे होऊन गेले त्यापैकी,
१. संत नामदेव महाराज
२. संत खुशालभारती महाराज



सध्या, श्री हरी लक्ष्मण महाराज हे मठाधिपती आहेत. भगवान बाबा हे नामदेव बाबांना आपला गुरु मानत असत व त्यांच्या दर्शनासाठी येथे येत असत. नामदेव बाबांना वैकुंठ्वास झाल्यानंतर त्यांच्या चाळीसाव्याचे कीर्तन भगवान बाबांनीच केले होते.
मार्गशीष वद्य प्रतिपदा ते वद्य नवमी या कालखंडामध्ये कीर्तन, प्रवचन,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. आमटी-भाकरीचा भंडारा असतो. २०-२५ हजार लोक भंडारयाचा लाभ घेतात.

श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदीर, पुणवाडी

गाव- पुणवाडी
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग अहमदनगर
तालुकाअहमदनगर
मुख्यालयनगर
क्षेत्रफ़ळ
लोकसंख्या
साक्षरता दर
तहसीलदार

श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदीर


या मंदीराला ’क’वर्ग भेट्ले आहे. या मंदीराच्या वरच्या बाजुस विठ्ठल-रुक्मिणीचे मंदीर आहे. समोर देवांची भ्क्त पदुबाई यांचे मंदीर आहे. मंदीराच्या आवारात मोठा सभामंडप आहे, देवाची पुजा रोज पहाटे २:३० वाजता होते. पुजेचे पथ्य खुप कडक आहेत.

श्री सिध्देश्वर मंदीर, सिध्देश्वरवाडी, पारनेर



हे महादेवाचे मंदीर आहे.मंदीराचे काम हे अतिशय भव्य आहे. सर्व बांधकाम दगडी आहे.

हे बांधकाम विश्वकर्मा यांच्या काळाचे आहे. येथे शिलालेखमोडी लिपीमध्ये कोरलेले आढळते. रामायण व महाभारताचा अभ्यास केल्यास पाराशर ऋषींना येथे तपश्चर्या केलेली आहे. या मंदीराचा संबंध पुराणाशी आहे.



चक्रधर स्वामी येथे दर्शनासाठी आले होते. मंदीराच्या मागच्या बाजुस धबधबा वाहतो. मंदीराच्या वरील बाजुस "कृषी वर्त" आहे. तेथे विठ्ठल मंदीर आहे. कृषीवर्ता समोरील कुंडमध्ये एका बाजुस गार व दुसऱ्याबाजुस गरम पाणी असते. मंदीराचे बांधकाम असे आहे की एप्रिल महिन्यात बरोबर पिंढीवर सुर्यकिरण पड्तात.
पुजारी-गिरी महाराज.

केडगावची रेणुकामाता

केडगावची रेणुकामाता


नगर रेल्वे स्टेशनपासुन सुमारे एक मैल अंतरावर केडगाव श्री रेणुकामातेचे जागृत स्थान आहे. शहरालगत असलेल्या या मंदिराचा फार पुरातन इतिहास आहे. पेशवेकालीन राजवाडे सरदारांनी देवीचे मंदिर उभारले. भरगच्च निवंडुगाचे झाडांनी वेढलेल्या या परिसरात विविध घनदाट वृक्षांमुळे जंगलाचेच स्वरुप प्राप्त झाले. वाघ या जंगलात मुक्तपणे वावरत असे. आश्चर्याची बाब म्हणजे रात्री देवी दर्शनास वाघोबांची स्वारी डरकाळ्या फोडत येई. त्यामुळे सायंकाळ्च्या आरतीनंतर सर्वजण घरी परतत.

          या मंदिराबाबतची आख्यायिका सर्व प्रचीती अशीच आहे. पुर्वी गुरव कुटुंबात श्री रेणुकामातेच्या कॄपाप्रसादाने पुत्ररत्न जन्मले. बाळाचे नाव आवडीने भवानी असे ठेवण्यात आले. या भवानीने रेणुकामातेची अखंड मनोभावे सेवा केली. श्री क्षेत्र माहूरगड हे त्यांचे मुख्य श्रध्दास्थान साडेतीन शक्तीपीठांतील हे एक पूर्ण पीठ होय. या माहुरगड हे निवासिनी रेणुकामातेच्या नामस्मरणात भवानी गुरव तल्लीन असायचे. त्यांच्या या निस्सीम भक्तीवर देवी प्रसन्न झाली. “मी आता तुझ्यासोबत येते" असे देवीने सांगताच आनंदाने भवानी गुरव परतीच्या प्रवासाला लागले. केडगावाच्या परिसरात येताच त्यांनी मागे वळून पाहिले. देवीचे दर्शन झाले, मात्र देवी जागेवरच अंतर्धान पावली. हल्ली त्याच जागेवर स्वयंभू श्री रेणुका देवीची मूर्ती आहे. ही मूर्ती अगदी हुबेहुब माहूरगडाप्रमाणेच आहे. देवीच्या समोरच ज्या ठिकाणी भवानी गुरवाने वळून पाहिले तेथे पादुका आहेत.

          रेणुकादेवीच्या मूर्तीशेजारीस तुळजाभवानीचीही मूर्ती आहे. मंदिराच्या उजवीकडे श्री महादेवाचे मंदिर असून शिवभक्तीच्या दर्शनाचा लाभ येथे मिळतो. छोटे विठ्ठल रुक्णिणी मंदिर व भैरवनाथ मंदिरही या परिसरात आहे.

           याच मंदिरात दैवदैठण येथील संत शिरोमणी श्री. निंबराज महाराज काशीयात्रेहून गंगेची कावड घेऊन परतत असताना देवीने गवळीच्या स्वरुपात दर्शन दिले. मंदिराच्या जवळपास वस्ती नसलेल्या ठिकाणी निंबराज महाराज आले असताना भुकेने व्याकूळ झालेले होते. त्यांनी सरळ देवीस विनवणी केली, तर साक्षात देवी गवळण होऊन डोक्यावर दुधाचा माठ घेऊन आली. त्यांनी अंतज्ञानाने जाणले व ते देवीभक्त झाले. त्यांनी आपल्याबरोबर काशीयात्रेहून आणलेली गंगेची कावड मंदिराशेजारील बारवेलमध्ये ओतली. आज कितीही उन्हाळा असलातरीही बारवेलमध्ये पाणी असतेच.

                १९४५ मध्ये के. बाबासाहेब मिरीकरांनी मंदिरापर्यतचा रस्ता ब्हावा, अशी अपेक्षा श्री गुरव कुटूंबीयांनी व्यक्त केली. येथे नवरात्रात घटी म्हणून स्त्रिया राहतात. मंदिराबाहेर पुरातन दीपमाळ आहे. परिसरात आराधी लोकांना राहण्यासाठी परसळी (ओवऱ्या) आहेत. मंदिराची पूजाअर्चा चार गुरवांच्या घरात विभागली आहे. शहरालगत असलेले हे मंदिर नवरनवला. मंदिराभोवती उंच तट असून, मुख्य मंदिरासमोर प्रशस्त प्रागंण आहे. मंदिराशेजारी भाविकासांठी सुंदर बगिचा तयार वात्रोत्सवासाठी सुशोभित करण्यात येते. येथे जाण्या-येण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून जादा गाड्याची सोय करण्यात येते. हजारो भाविक देवीदर्शनाने मंत्रमुग्ध होतात. हार फुले-नारळ खाद्यपदार्थ व खेळणीच्या दुकाणे असतात. नवरात्रोत्सवातील सातव्या माळेस येथे भव्य यात्रा भरते. नवमीस मोठा होम होतो व दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपुजन होते आणि देवीचे पारंपारीक दागिने चढवीले जातात. सीमोल्लंघनाच्या दिवशी मानाच्या काठ्या श्री रेणुकामातेच्या दर्शनाने गेल्यानतंर उत्सवाची सांगता होते.

श्री विठ्ठल-रुख्मिणी (धाकटी पंढरी) मंदीर





शेवगाव तालुक्यातील वरुर बु. मधिल हे मंदीर संपुर्ण गावकऱ्यांचे श्रध्दास्थान आहे.





आख्यायिका:
वरुर गावचा खांबट नावाचे पाटील होते. एके दिवशी त्यांच्या स्वपनात विठ्ठल-रुक्मिणी आले व सांगीतले कि "आम्ही काळेगाव टोका गावातील एका इस्माच्या उकांड्यामध्ये आहोत. "पाटील दुसऱ्यादिवशी त्या ठिकाणावर गेले व ती जागा विकत घेतली व तेथे खोद्ण्यास सुरवात केली. खोदत असताना मुर्तीच्या डाव्या डोळ्यावर कुदळीचा घाव लागला, मुर्तीच्या डोळ्यातुन रक्त वाहु लागले. मग मुर्ती थोड्या वर काढल्या. ही गोष्ट कळाल्यावर काळेगाव टोकातील गावकरी तेथे गोळा झाले व त्यांनी मुर्ती गावाबाहेर नेण्यास विरोध केला आणि मुर्ती बैलगाडीत टाकल्या, त्या गाडीचा चकणाचुर झाला. तरीसुध्दा विरोध कायम होता. मग खांबट पाटील मागारी निघाले. जसे पाटील मागारी फ़िरले तशी मुर्ती गायब झाली. हा चमत्कार घडल्यानंतर काळेगाव टोकातील मंडळींनी पाट्लांना थांबवले व मुर्ती नेण्यास परवानगी दिली तेव्हा मुर्ती पुन्हा वर आलेली दिसु लागली. मग मुर्ती गावात वाजत-गाजत आणण्यात आली व तिची स्थापणा करण्यात आली.
आषाढी-पोर्णिमेला काल्याच्या दिवशी मंदीरामध्ये भजन चालु असताना मुर्तीच्या अंगावर घाम येतो, असे गावक्ऱ्यांचे म्हणने आहे.. हे खुप जागृत मंदीर आहे.  



श्री क्षेत्र गोरक्षनाथ मठ, मांजरसुंबा, नगर


गोरक्षनाथांची मुर्ती स्वयंभु आहे. नवनाथांनी येथे १ महिना वास्तव्य केले आहे त्यानंतर सर्व नवनाथांनी स्थलांतर केले. इ.स.१८४६ साली मंदीराचा जीर्णोध्दर झाल्याचा उल्लेख सापडतो. अंबादास भिकाजी कदम येथील पुजारी आहेत.
श्रावण महिन्यात येथे महिनाभर श्रावणी यात्रा असते. मुख्य यात्रा  तिसऱ्या व चौथ्या सोमवारी असते. येथे प्रत्येक महिन्याल्या राहुरीच्या गोरक्षनाथ मंड्ळ यांच्याकडुन भंडारा असतो. कार्तिक शु.१३ ला गोरक्षनाथ प्रकटदिन साजरा केला जातो. महाशिवरात्रीला देवाला गंगेच्या पाण्याने आंघोळ घातली जाते, यासाठी पायी कावडी जातात. आषाढी एकादशीला  यात्रा भरते. शुध्द एकादशीला भंडारा असतो.

श्री विरभद्र (बिरोबा) देवस्थान, मिरी


श्री विरभद्र मंदीर हे मंदीर पाथर्डी तालुक्यातील मिरी या गावातील प्रसिध्द मंदीर आहे. या मंदीराला आतल्या बाजुने काचकाम केलेले आहे.

आख्यायिका :
राजस्थान मधील घोडगिरी येथे भुत्तीरबुआ होते. राजस्थान मधील काही लोकांनी भुत्तीरबुआंच्या कावडींना विरोध केला. त्यावेळेस त्यांनी येथे राहणार नाही असे ठरवले. आधी ते नेवासा येथे आले व धनगरवाडीत बसले, परंतु त्यांना कोणी ओळखु शकले नाही .त्यांनी नंतर कोल्हारला मुककाम केला. मग त्यांनी जिथे मन रमेल तेथे राहण्याचे ठरवले, मिरी येथे त्यांना मेंढरे दिसली, त्यांनी येथेच राहण्याचे ठरवले. मग ते कै.मनाजी भगत यांच्या स्वप्नात दर्शन दिले व मंदीर बांधण्यास सांगितले. बिरोबा त्यांच्या अंगात यायचे व अंगावर लाकडी तलवारीचे वार घ्यायचे. इंग्रज अधिकारयाला ही गोष्ट खोटी वाटु लागली. त्याने स्वत:हा त्यांच्या अंगावर लोखंडी तलवारीने वार केले, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.
दसरयानंतर ५ दिवसांनी (कोजागिरी पोर्णिमेला )  येथे वैख असतो. हा वैख ऎकण्यासाठी  आसपासच्या गावातील लोक गर्दी करतात.
या दिवशी  श्री सिताराम मनाजी भगत यांना देवाचे वारे येते, त्यावेळेस ते अंगावर तलवारीचे वार घेतात व वार्षिक भविष्य(पाऊस,नैसर्गिक आपत्ती, किंवा देशात काही  बदल होणारे ) सांगतात. हे मंदीर गोपाळराव मिरीकर यांच्या जागेत आहे. जत्रेच्या दिवशी गावातुन त्यांची मिरवणुक निघते.

श्री विशाल गणेश मंदीर




श्री विशाल गणेश मंदीर, माळीवाडा, अहमदनगर

श्री विरभद्र देवस्थान (शहाडोंगर), बारदरी


वीरभद्र देवस्थान हे ६०० वर्षापुर्वीचे मंदीर आहे. या मंदीराचे बांधकाम हे चांदबीबी महालाच्या कामा बरोबर झाले आहे.
चांदबीबी महालाचे शिल्पकार लिंगायत व जंगम यांची विरभद्र देवावर खुप श्रध्दा होती. हे लोक सकाळी देवाचे दर्शन घेतल्याशिवाय पाणी सुध्दा घेत नसत. त्यामुळे ते महिन्यातुन १-२ वेळेस कर्नाट्कास दर्शनासाठी जात असत. त्यामध्ये त्याचां खुप वेळ जात असत. देव गावच्या पाट्लाच्या स्वप्नात आले व सांगितले की मी दिवटे डोंगरावर प्रकट झालो आहे. मुर्ती गावात आणुन  गावातील लोकांनी तिची स्थापना केली. लिंगायत व जंगम लोकांनी मंदीराचे बांधकाम केले. सर्व जंगम समाजाचे हे कुलदैवत आहे. मुर्ती ५॥ फ़ुट उंच आहे.

मंदिरामध्ये वर्षातुन चार उत्सव होतात,
१.मानुरकर महाराज यांची पण्यतिथी सोहळा(आषाढ-शुध्द षष्टी)या दिवशी असतो.
२.इराणी यात्रा-बैलपोळ्याच्या दुसरयादिवशी ही यात्रा असते.
३.कार्तिक पोर्णिमेच्या दुसरयादिवशी जंगम लोकांची यात्रा असते. महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील जंगम समाजाची सर्व लोक येतात.
४.मार्गशीष शुध्द प्रतिपदेला देवजन्म(उप्परगुढी)साजरी होते.
मंदीराची व देवाची पुजा व सेवा करण्यासाठी ९ पुजारी आहेत.
विरभद्र मंदीर देवस्थान ट्र्स्ट येथे कार्यरत आहे.

श्री देवीभोयरे देवस्थान




श्री देवीभोयरे मंदीर हे देवीभोयरे गावातील, पारनेर तालुक्यातील प्रसिध्द मंदीर आहे. मंदीराची स्थापना कै. शंकर देवराव क्षीरसागर यांनी  सन १९१२ मध्ये केली.




आख्यायिका :
क्षीरसागर कुटुंबाची माहुर गडच्या रेणुकेवर खुप श्रध्दा होती. ते माहुरगडी नवरात्रोत्तसवासाठी आवर्जुन जात असत, पण पुढे वय झाल्यावर प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना माहुरगडी जाण्यास जमत नसे. त्यांना रोज पुजेच्यावेळी जाणवायचे की आपला नेम चुकला आणि त्यांना गहिवरुन आले. त्यांची भावभक्ती व तळमळ जगदंबेला जाणवली. देवीने त्यांना स्वप्न दृष्टांत दिला. मी भेटायला आले आहे. असे त्रिवार स्वप्न  पडले व स्नप्नांत व स्वप्नात देवीने त्यांना ठावठिकाणा दाखविला.

क्षीरसागर कुटुंब हे प्रथम चोंभुत ह्या गावी रहात असत. चोंभुत हे देविभोयरे येथुन १८ किमी वर नैऋत्य दिशेस आहे. त्यांना देवीने स्वप्नदृष्टांत देऊन जी जागा दाखविली ती म्हणजे देविभोयरे गाव होय. असे स्वप्न २/३ वेळेस पडले. सतत स्वप्नदृष्टांत झाल्यावर व जागाही दिसल्यावर क्षीरसागरांनी त्याठिकाणी जाऊन जागा खणण्यास सुरवात केली आणि आश्चर्य म्हणजे तिथे पाषाणाची तांदळाकृत प्रतिमा व सभोवती हळदी-कुंकवाच्या भरलेल्या पेट्या, अशा स्वरुपातील निर्गुण जगदंबा तांदुकार मुर्ती सापडली. त्या दिवसाचा योग अंत्यंत उज्जवल असल्याचे जाणुन, तिथल्यातिथेच एक वेदिका रचुन ती मुर्ती समंत्रक स्थापण केली. देवीच्या मुर्तीसमोरील सिंह जे धर्मस्वरुप मानले जाते ती सोनपितळेची मुर्ती १६.५ किलो वजनाची आहे. भुविवरात देवी प्रकट झाली म्हणुन त्याला देवीभुविवर म्हणु लागले व त्याचे आज देवीभोयरे म्हणुन नाव पडले

श्री क्षेत्र हनुमान टाकळी


श्री क्षेत्र हनुमान टाकळी ता. पाथर्डी येथे श्री संत समर्थ रामदास स्वामींनी स्वहस्ते गोमयीन श्री रामभक्त हनुमानाची वरदह्स्ताची एक भव्य मुर्ती स्थापून आज ३५० वर्षे होऊन गेली. पुर्वकालापासून ते आजवरच्या इतिहासात देवमुर्तीचे निर्माणात, श्री समर्थांची ही एक क्रांतदर्शी, दिव्य दृष्टी प्रत्यक्ष गोमयातून देवत्व साकार करुन सकलजनांचे कल्याणार्थ, साधकास वा भक्त-भाविकास वांछित प्रसादप्रदायक उपासनेत तेजस्वी व उन्नत अनुभव देणारी त्याचप्रमाणे विशेष जागृतता, निर्मिणारी म्हणून दूरदूरवर सहजच प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे समर्थांच्या त्यावेळीच्या भारताच्या भीषण काळात या महान रामभक्ताने भारतभर ११०० मारुती व धर्मस्थाने निर्माण करुन भारताचे धर्म वैभव स्थिर केले.

सूज्ञांच्या मते हे स्थान हर्षवर्धनाच्या काळात झालेल्या एका महान यज्ञाची पावनभूमी म्हणून इतिहास नमूद आहेच. याच परिसरामध्ये उत्तरवाहिनी दोन नद्यांचा संगम पुराणकालापासून विशेष प्रसिध्द आहे. महर्षि भगवान व्यासांनी लिहिलेल्या अठरा पुराणांपैकी प्रथमचे गणले जाणारे पुराण ब्रम्हपुराण यामध्ये गोदावरीच्या दक्षिणकाठी ६० विशेष तीर्थ आहेच. पैकी वृध्दासंगम तीर्थ म्हणून एक विशेष अख्यायिका वृध्देश्वर देवालयासहित आलेली आहे. त्यात येथील सुंदर गुफेचाही उल्लेख आलेला आहे. हे सारे विचारात घेता श्री समर्थ रामदासांनी या पावनभूमीमध्ये त्या काळी टाकळीच्या झाडांचे जंगल असतानाही भक्ति-शक्ति दाता मारुती स्थापन करुन मोठाच धर्मोद्देश साधला आहे.


आज या परिसरात परंपरेने चालत आलेली आषाढ वद्य चतुदर्शीला रहाड यात्रा होत असते. या यात्रेत लांबून येणारे अबालवृध्द सहभागी होतात व विस्तवावरुन चालतात. हे येथील एक वैशिष्ट्य आहे. आजपर्यंत ही पावनमुर्ती साध्या माळवदी व मातीचे मंदिरात खणात होती. परंतु विश्वानुभूती स्वांगाने घेणारे महान संतद्वय श्री समर्थ रामदास स्वामी व श्री संत मोरेश्वरनाथ अर्थात श्री बाबा महाराज आर्वीकर श्री क्षेत्र मोक्षधाम माचणूर या दिव्यत्म्यांनी टाकळीच्या हनुमान मंदिराचा जिर्नोध्दार करावा म्हणून श्री माधव स्वामी यांना सुचित केले. या मंदिर जीर्णोध्दाराच्या कामाचा प्रांरभ माघ शुध्द पोर्णिमा दि. ९ फेब्रुवारी २००९ रोजी होत आहे.

श्री दत्त देवस्थान ट्र्स्ट, सावेडी, अहमदनगर


अहमदनगर येथील श्री दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना दत्तावतारी सत्पुरुष प.पू.श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी १९७४ मध्ये केली. वेदविद्येचे संरक्षण व संवर्धन हा ह्या ट्रस्टच्या स्थापनेचा प्रमुख हेतु आहे. आपली ही प्राचीन विद्या काळाच्या ओघात लोप पावू पहात आहे. वेदांच्या अनेक उपशाखांपैकी (सुमारे ११००) आजमितीला काही मोजक्याच शाखा अस्तित्वात आहेत व त्यातील जाणकारांची संख्याही अत्यंत अल्प आहे. पूर्वी राजाश्रयाच्या आधारे ही विद्या जतन केली गेली. आज लोकाश्रयाच्या आधारावर तिचे जतन करणे आवश्यक आहे, हे ओळखून प.पू.सदगुरुंनी ट्रस्टची स्थापना केली.
वेदविद्या ही आपल्या धर्माचा पाया आहे. वेद हे अपौरुषेय आहेत. वेद ऋषिमुनींना ध्यानावस्थेत ऐकू आले, त्यांनी वेदांचे उच्चारण केले व आपल्या शिष्यांना शिकवले. वेद हे मंत्रस्वरुपात असून त्यांच्या उच्चारणाला फार महत्त्व आहे. योग्य व्यक्तींकडून त्यांचे शास्त्रशुध्द उच्चारण झाल्यास ईश्वरी शक्ती प्रकट होते. वेदांच्या उच्चारण झाल्यास ईश्वरी शक्ती प्रकट होते. वेदांच्या उच्चारणाने सर्वच जीवसृष्टीवर चांगले परिणाम होतात. वेद अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत.
वेदविद्या ही पाठांतरावर आधारित विद्या आहे. वेदध्ययनात योग्य उच्चारांना फार महत्त्व असल्याने वेद गुरुमुखातूनच शिकावे लागतात. वेदपठण करणाऱ्यांना आहार-विहार, आचार-विचार यांचे नियम फार काटेकोरपणे पाळावे लागतात. त्यामुळे वेदविद्या उत्तम रीतीने शिकण्याकरिता गुरुकुल पध्दतीची आवश्यकता आहे. एक वेद शिकण्यासाठी सुमारे १२ वर्षाचा काळ लागतो. तसेच पाठांतर व योग्य उच्चार यांचे संस्कार बालपणीच्या संस्कारक्षम वयातच व्हावे लागतात. हे लक्षात घेऊन १९८८ साली ट्रस्ट तर्फे "वेदान्त" ही वास्तू बांधण्यात आली. सुमारे १०० विद्यार्थी गुरुकुल पध्दतीने शिकू शकतील एवढी सोय येथे विनामूल्य करण्यात आली आहे. शिक्षणासाठी विद्वान व आचारसंपन्न आचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मोफ़त वेद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बुध्दीला तेज यावे म्हणून गाईचे दूध, तूप मुलांना दिले जाते. त्यासाठी नगर-औरंगाबाद रस्त्यावर स्वामी नृसिंह सरस्वती तपोवनात गोधन सांभाळले आहे.
वेदविद्येबरोबरच दुर्मिळ धार्मिक ग्रंथांचे जतन करुन, त्यांचे योग्य प्रकारे रक्षण करण्याचे कार्यही संस्थेने हाती घेतले आहे. दुर्मिळ असे अनेक ग्रंथ येथे जिज्ञासूंना अभ्यासासाठी उपलब्ध आहेत.
वैदिक धर्म हा आचरणावर आधारित आहे. आजच्या काळानुसार तो कसा आचरावा ह्याचे गुरुदेवांनी वेळोवेळी जे मार्गदर्शन केले ते "गुरुवाणी" आणि "अमृत कलश" या पुस्तक मालिकांतून प्रकाशित केले जाते. ह्या ग्रंथसंपदेद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य अव्याहतपणे केले जाते. तसेच धर्माचे स्वरुप सामान्यजनांना उलगडून सांगण्यासाठी संस्थेतर्फे ज्ञानसत्रेही आयोजित केली जातात. ह्यासाठी श्री महालक्ष्मी मंडप ही भव्य वास्तू बांधण्यात आली आहे.
पुढील काळात सामान्य भक्तांना चिरंतन आधार मिळावा ह्यासाठी एक भव्य दत्तमंदिर बांधण्याचा संकल्प प.पू. सदगुरुंनी सोडला होता. तो गुरुदेवांनी भक्तांकरवी पूर्ण करुन घेतला. गुलाबी रंगाच्या बन्सी पहाडपूर दगडात, कोरीव कामाने सुशोभित अशा ह्या सुंदर मंदिरात भगवान श्री दत्तात्रेयांच्या संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शृंगेरी पीठाधीश्वर जगतगुरु श्री भारतीतीर्थ महास्वामी यांच्या परमपावन करकमलांनी दि. ११ जुलै २००७ रोजी संपन्न झाली. संपूर्ण भारताचे भूषन असे हे मंदिर सर्व दत्तभक्तांना श्रध्देचे व अभिमानाचे स्थान आहे.
या दत्तमंदिरातील देवदेवतांची त्रिकाल पूजा व आरती केली जाते. तसेच तेथील देवतांवर रुद्र, पवमान, पंचसूक्त इ. अभिषेक नित्य केले जातात. भक्तांतर्फे साधा अथवा दुधाचा अभिषेक, सहस्रनाम पाद्यपूजा, शाश्वत पूजा, लघुरुद्र केले जातात. याशिवाय श्रीदत्तदेवस्थान ट्रस्टतर्फे वेळोवेळी नवचंडी, शतचंडी, महारुद्र, गणेश याग यांसारखी धार्मिक अनुष्ठानेही केली जातात. गुरुपौर्णिमा, श्री दत्तत्रेय जयंती, श्री शंकराचार्य जंयती आणि प.पू. गुरुदेवांची जयंती हे उत्सव इथे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.
श्री दत्त देवस्थानामध्ये गुरुचरणांचे दर्शन आपल्याला सकाळी ७ ते ११,दुपारी ३ ते ५ व रात्रौ ७.४५ ते ८.३० या वेळात होऊ शकते.

संस्थेचा पत्ता :
श्री दत्त देवस्थान ट्रस्ट, श्री दत्तात्रेय निवास, वेदांत नगर, मनमाड रोड, अहमदनगर - ४१४ ००३.
दूरध्वनी : (०२४१)२४२३५८५, (०२४१)२४२४८७५.

नृसिंह मंदीर (भातोडी)


मंदीराची स्थापना १३०० -१४०० या काळात झाली आहे. कान्हो नर्सी नावाचा प्रधान हा शाही दरबारात होता. तो खुप ईमानदार होता. परंतु दरबारातील काही मंड्ळींनी त्यांच्या विरुध्द बादशहा चे कान भरले. यामूळे बादशहाने त्यांना प्रधान या पदावरुन निलंबित केले. त्यावेळेस त्यांनी भातोडी येथे अनुष्ठान केले व नवस बोलला. ठीक ४ दिवसांनी त्यांच्यावरील आरोप टळला व बादशहाने त्यांना दरबारात बोलावुन घेतले व त्यांना त्यांचे पद परत देण्यात आले. त्यांनी बोललेल्या नवसाप्रमाणे मंदीराची उभारणी केली. मंदीराला भक्क्म तटबंदी करुन त्यावर मंदीर बांधले आहे. मंदीराच्या समोर मेहकरी नदी आहे या नदिचा उगम आगडगाव-रतडगावच्या डोंगरावरुन झाला आहे.

याच मंदीराचे प्रतीरुप  पाकिस्थानात कराचीमधील नरसिमपाल या भागात आहे. या मंदीरावर आनंद जोशी यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे.
या मंदीरामध्ये पांडुरंग खंडु राऊत हे व्रुध्द बासरीवाद्क खुप सुंदर बासरी वाजवतात.

पद्मावती देवीमंदीर, घोसपुरी

पद्मावती देवीमंदीर, घोसपुरी
हे आतिशय भव्य व प्रसिध्द मंदीर आहे. या मंदीरचे संपुर्ण काम काचेमध्ये केलेले आहे . येथील मंदीराच्या बाजुला विहीर आहे ,या विहीरीमधुन नवरात्रामध्ये सोन्याची घागर वर येते असे ,असे स्थानिक लोकांचे म्हणने आहे.

आख्यायिका :
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापुर गावतील जठार घराण्यात एक व्यक्ती राह्त होती. तो माहुरगडाच्या जगदंबेची अतिशय मनापासुन भक्ती करत होता. त्याचे लग्न होऊन बरेच दिवस झाले ,परंतु त्याला मुलबाळ होईना म्हणुन त्याने माहुरगडच्या जगदंबेला मुलबाळ होऊ दे, असे साकडे घातले व तो जगदंबेची मनापासुन भक्ती लागला .त्याला एके दिवशी रात्री स्वप्न पड्ले की ,स्वप्नात देवीने सांगितल्याप्रमाणे तो भल्या पहाटे उठुन शेताता स्व्प्नात सांगितलेल्या ठिकाणी गेला. तेवढ्यात एका छोट्याशा बालकाचे रड्णे ऎकु आले .नंतर तो आवाजाच्या दिशेने जावु लागला .जवळ गेल्यानंतर त्याला फ़ुललेल्या तरवडाच्या झाडाखाली एक सुंदरशी मुलगी द्रुष्टीस पड्ली .त्याने ते छोटेसे बालक अलगत उचलुन आपल्या घरी आणले . तिला पाहताच त्याच्या पत्नीला व घरातील सर्वांना आनंद झाला ते दोघेही त्या मुलीचा सांभाळ ,पालणपोषण करु लागले. तिचे नाव पद्मावती असे ठेवले. जगदंबेच्या क्रुपेमुळे तिला घरातील सर्व मंड्ळी अंबिका असे म्हणत. अंबिका आता उपवर झाली .तिचे लग्न करावे असे तिच्या आई-वडिलांना वाटु लागले. मुलाचा शोध घेता घेता नगर तालुक्यातील मौजे रुईछ्त्तीशी येथील दरंदले कुटुंबातील एका मुलाशी अंबिकेचा विवाह ठरला. योग्य वेळेत तिचे लग्न करण्यात आले. अंबिका सासरी जावु येऊ लागली. दरंदलेंचा शेतीचा व्यवसाय फ़ार मोठया प्रमाणात होता. दिवस उन्हाळ्याचे होते. त्याने नांगराची इरजीक घालावयाचे ठरविले. अनेक शेतकरयांना इरजीकाचे आमंत्रण देण्यात आले. नंतर अंबिकेला न्याहरीसाठी स्वंपाक करावयास सांगितले. इरजिकीचा दिवस उगवला .अंबिकाने स्वंपाक करण्यास सुरवात केली. तिने ५ भाकरी व शेडगाभर कालवण केले. सासरे भाकरी घेण्यासाठी शेतावरुन घरी आले तर सुनबाईने भाकरीचे टोपले भरुन ठेवले होते. सासरयाने टोपले उचलुन शेतावर नेले. न्याहरीची वेळ झाली होती .शेतक्ररयांना त्यांनी न्याहरीसाठी हाक मारली. भाकरी कालवणाचे टोपले सोडले असता टोपल्यात पाचच भाकरी असल्याचे निदर्शनास आले. हे पाहुन सासरयांना विचार पडला. हे जेवण सर्वांना कसे पुरणार ? पण भुकेची वेळ असल्यामुळे सर्वांनी ठरविले की थॊडी थॊडी भाकरी खाऊया तर सासरयांनी जेवण वाढण्यास सुरवात केली. जेवढ्या भाकरी उचलल्या जात तेवढ्याच भाकरी टोपल्यात परत दिसु लागल्या .कालवणही तेवढेच दिसु लागले. सर्वांची जेवणे पोटभर जेवणे झाली तरी टोपल्यात पाच भाकरी व शेडगाभर कालवण तसेच शिल्लक राहिले. सर्वजण आश्चर्यचकित झाले .ही बातमी शेतकरयांमार्फ़त  हा हा म्हणता संपुर्ण रुई गावात पसरली . अंबिकेच्या सासुला ही बातमी कळली ती अतिशय नाराज झाली .तिला वाटले की कोणीतरी काट्कीन आहे. हिला आपल्या घरंदाज कुटुंबात ठेवणे चांगले नाही,असे कुटुंबातील सर्वांना वाटले, दुसरा दिवस उजाडताच दुसरयादिवशी अंबिकेला माहेरी पाठवण्याची. सुनबाईना माहेरी घेऊन जाण्यासाठी सासरयांची नेमणुक झाली. त्याकाळी कुठल्याही प्रकारची वाहने नव्हती. सासरयाच्या घरी एक सुंदरशी घोडी होती .ती घोडी घेऊन अंबिका व सासरे यांचा प्रवास सुरु झाला. विसापुरच्या अलिकडे नगर तालुक्यातील घोसपुरी नावाचे गाव आहे. तेथपर्यंत येण्यास दुपार झालीहोती. कडक उन्हाळा असल्यामुळे घोसपुरी गावातील एका विहीरीवर विसाव्यासाठी अंबिका व तिचे सासरे थांबले. त्या विहीरीवर पाणी काढण्यासाठी काहीच साधन नव्हते. त्या विहीरीच्या मालकास विचारले असता त्यानेही काही साधन नसल्याचे सांगितले,म्हणुन त्यांनी थोडे पुधे जावुन नदीच्या कडेला झरा  पाहिला व त्या ठिकाणी अंबिका पाणी आणण्यासाठी गेली. पाणी घेतले व सासरयांना दिले व  अंबिका देखील पाणी प्याली. झरयाजवळील निसर्गरम्य परिसर पाहुन अंबिकेचे मन रमले व अंबिका काहीतरी निमित्त करुन सासरयापासुन दुर अंतरवर गेली .अंगावरील सर्व दाग-दागिने झरयाजवळील एका दगडाखाली  ठेवुन ती तेथे गुप्त झाली. बराच वेळ झाला अंबिका काही येईना.सासरा विचारात पडला. त्याने अंबिका म्हणुन मोठ-मोठ्याने हाक मारण्यास सुरवात केली . तर गावापासुन २ कि.मी अंतरावर असलेल्या टेंभी नावाच्या डोंगरावरुन जी असा आवाज एकु येवु लागला. आवाजाच्या दिशेने सासरा घोड्यावर बसुन टेंभीच्या डोंगरावर धावत गेला. तेथे जावुन पाहतो तर अंबिका कोठेच दिसेना, टेंभीच्या डोंगरावरुन अंबिका अशी हाक मारली देवीने त्यांना गुप्त झालेल्या ठिकाणावरुन आवाज दिला .सासरे पुन्हा घोड्यावर बसुन गुप्त झालेल्या ठिकाणी आले. त्या घोड्याबरोबर त्या घोड्याचे शिंगरु होते. तेथे येवुन आपल्या सुनेस शोधले परंतु देवी दिसली नाही. यावेळी त्यांनी पुन्हा देवीला हाक मारली. त्यावेळी देवीने टेंभीवरुन आवाज दिला पुन्हा पुन्हा असे घडत राहिल्याने घोडी व शिंगरु टेकडी चढता चढता थकुन गेले .घोडी व शिंगरु ज्या ठिकाणी थकले त्या ठिकाणी त्यांचे पावले पाषाणात उमटले. त्या पाऊलखुणा आजही जशाच्या तशा दिसतात.
सासरे घोडी व शिंगरु घेवुन गुप्त झालेल्या ठिकाणी आले. अंबिकेचा शोध घेता-घेता सासरे फ़ार थकले व विचार करु लागले की ,घरच्या व माहेरच्या लोकांना काय सांगावे? या प्रश्नाचा विचार करता करता त्यांनी जीव सोड्ला .हे पाहुन घोडी व शिंगरु त्या देहाच्या कडेने फ़िरु लागले व किंचाळु लागले.मालकाची कुठल्याही प्रकारची हालचाल न दिसल्यामुळे त्या बिचारया मुक्या प्राण्यांनीही आपला देह सोडला. पद्मावती सासुच्या स्वप्नात गेली व गुप्त झालेल्या ठिकाणाची माहिती द्रुष्टांत रुपात सांगितली. झरयाजवळील एका दगडाखाली दाग-दागिणे ठेवले आहेत त्याच ठिकाणी सासरे,घोडी व शिंगरु यांचा त्याच ठिकाणी देहत्याग झालेला आहे. दरंद्ले कुटुंबातील व्यक्तींनी त्या ठिकाणी येवुन शहनिशा केली. त्यावेळी घोसपुरी गावातील लोकांनी त्या ठिकाणी सासरयांची व घोड्याची समाधी बांधली व ज्या दगडाखाली दाग-दागिने ठेवले होते ते पाहण्यास गेले.त्या ठिकाणी  दाग-दागिने व तांदळा(देवीचा) सापडला .ते दाग-दागिने त्यावेळी दरंदले कुटुंबीयांच्या स्वाधीन झाले. तांदळा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्यात आले व मंदिरा तांदळाची विधी विधीनपुर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आजही तो तांद्ळादर्शनासाठी खुला केला जातो.

श्री क्षेत्र मळगंगा देवी, चिंचोली, पारनेर


मळ्गंगा देवी ६५० गावांचे कुलदैवत आहे. यात काही गावांचा काठ्यांचा मान आहे. मंदीराला ७४ एकर जमीन आहे.येथील पुजारी हे वडीलोपार्जित आहेत.
पुजारी -दत्तात्र्य जग्गनाथ वाघमारे.



आख्यायिका :
पारनेर चे पराशर ऋषी पारनेर येथे होम-हवन कार्यक्रम त्यांचा नित्यनियमाने चालत असे.त्यांना त्रास देण्यासाठी म्हणजे त्यांच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी ’धुम्र’राक्षसाने प्रयत्न केले होते. मग पराशर ऋषींनी गणपतीची आराधना केली. तो गणपती म्हणजे गणेशखिंडीतील गणपती, ज्यावेळेस गणपतीला हा राक्षस  आवरला नाही, त्यावेळी त्याने आईची आराधना केली म्हणजे पार्वतीची. पार्वतीने सांगितले की तो राक्षस माझ्याच्यानेही आवरणार नाही. त्यावेळी तिने शंकराच्या जटातील "मुळगंगा"हिच्या साह्याने धुम्र राक्षसाशी युध्द केले त्यात मळगंगेला यश आले. त्या डोंगराचे नाव धुम्या डोंगर म्हणुन ओळखले जाते. तिथुन डोंगर सोडुन मळगंगा डोंगर सोडुन  चिंचेच्या बनात आली. त्यामुळे या गावाला "चिंचोली" हे नाव पड्ले आहे. त्याठिकाणी मळगंगेचे मन रमले त्या ठिकाणी तिची स्थापना झाली. त्यावेळी पासुन ही "मळ्गंगा" या नावाने व पार्वती "वडजाई" या नावाने ओळखले जाऊ लागले. या मळगंगेला कौल लावला जातो. चैत्री पोर्णिमेला देवीला हळद  लावण्याचा कार्यक्रम होतो. चैत्री वैद्य सप्तमीला देविचा उत्सव असतॊ. ज्या महिलांना बरेच वर्ष आपत्य होत नाही त्या देवीला कैल लावण्यासाठी येथे येतात आणि देवीला कौल लावुन आपली मागणी मागतात. यात्रेच्या दिवशी "हेका" म्हणुन कार्यक्रम असतो. मळगंगेच्या सात ठिकाणांपैकी हे मुळ ठिकाण आहे. पारनेरपासुन मंदीर ८ किमी अंतरावर आहे. मंदीराचे विशेष म्हणजे नवरात्रत संपुर्ण गावाचे घट मंदीरातच स्थापण होतात. "मळेवडजाई देवस्थान ट्रस्ट " येथे कार्यरत आहे.

श्री तुळजाभवानी माता (सप्तऋंगी माता) मंदीर, बुऱ्हाणनगर


महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे बुऱ्हानगर (अहमदनगर) हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येते. यामागचे मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती नगरहून आणलेल्या पालखीतून सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते. तब्बल पाचशे वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर-माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाही, हे विषेश!
पैठणच्या शालिवाहन राजघराण्याला उतरती कळा लागल्यानंतर राजा शंभूराव यांनी देवीची मूर्ती व सिंहासन बुऱ्हानगरला आणून ठेवले. त्यावेळी या ठिकाणचे नाव अंधेरी नगरी होते. याठिकाणी तेलंगा नावाचा राजा होता. देवीची मूर्ती तब्बल ३०० ते ४०० वर्षे याठिकाणी होती. हे राजघराणे प्रथम देवकर व नंतर भगत आडनावाने ओळखले जाऊ लागले. आज या घराण्याचे वंशज अर्जुन किसन भगत हे आहेत. तेलंगा राजा कर्नाटकवर स्वारी करण्यास गेल्यानंतर मूर्ती बरोबर घेऊन गेले. डोंगराळ परिसर असलेल्या चिंचपूर(तुळजापुर) मध्ये मूर्ती सुरक्षेसाठी ठेवली. लढाई चालू असताना तेलंगा राजाचा अंत झाला. आज श्री तुळजा भवानी मातेच्या डाव्या बाजूच्या टेकडीवर तेलंगा राजाची समाधी आहे. त्यानंतर बहामनी राजवट सुरु झाल्यावर मूर्ती पुन्हा बुऱ्हानगरला आणली.
अहमदनगरला निजामाचा त्रास होऊ लागल्यावर मूर्ती पुन्हा तुळजापूरला नेण्यात आली. निजामच्या नजरेपासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी जानकोजी देवकर भगत यांनी अपार कष्ट घेतले. निजामाची करडी नजर चुकवत मूर्ती परत नगरला नेली आणि निजाम राजवट संपुष्टात येताच तुळजापुरला आणली गेली. जानकोजी हे देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांची देवीवर अपार श्रध्दा होती. देवीने त्यांना एकदा मुलीच्या रुपात दर्शन दिले. त्यांनी तिचे नाव कौतुकाने अंबिका ठेवले. या अंबिकाने जानकोजीच्या तेलाच्या व्यवसायात त्यांना सर्वार्थाने मदत केली. या व्यवसायामुळे सावकाराच्या देण्यातून जानकोजी मुक्त झाले. ते श्रीमंत होऊन पंचक्रोशीत प्रसिध्द व्यापारी म्हणून परिचित झाले. बुऱ्हानगरच्या बादशहाची अंबिकेच्या सौंदर्यावर नजर गेली. बादशहाने अंबिकेला आणण्यासाठी सैन्य धाडले. मात्र तिला स्पर्श करण्याचे धाडस कुणाचेच झाले नाही. त्यावेळी अंबिकेने शाप दिला की बुऱ्हानगर निर्मनुष्य होईल. त्यामुळे गावात रोगराई वाढली. अनेक जण गाव सोडून गेले. मात्र जे ख्ररे देवीभक्त होते; ते तेथेच राहिले. त्यानंतर देवीने जाणकोजींना खरे रुप दाखविले व ती लुप्त पावली.
जानकोजी देवीविना वेडेपिसे झाले. ते फिरत तुळजापूरला आले. देवीची करुणा भाकू लागले व ते जीव देणार इतक्यात अंबिका प्रकट झाली. त्यावेळी जानकोजी देवीला म्हणाले, मी जशी तुझी सेवा केली तशी माझ्या पिढ्यानपिढ्यांना ही सेवा लाभावी. त्यावर देवी म्हणाली, तू पाठविलेल्या पालखीतून मी सीमोल्लंघन करीन व पलंगावर पाच दिवस निद्रा करीन. तेव्हापासून आजतागायत या पलंग पालखीच्या सोहळ्यात खंड पडलेला नाही. अहमदनगर पासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या बुऱ्हानगरात भगत (देवकर) घराण्यातील मंडळींनी १९९३ साली स्वखर्चाने शेतजमीन विकून देवीचे मंदिर बांधले. या मंदिराच्या पूजेचे व मानपानाचे अधिकार व व्यवस्था विजय अर्जुन भगत पाहतात.
दरवर्षी नवीन पालखी नगरजवळील हिंगणगावात केली जात होती. त्यानंतर ती राहुरीमध्ये बनविली जात आहे. पोळ्याच्या दुसऱ्यादिवशी पालखीसाठी लागणारे साहित्य अर्जुन भगत पुरवितात. गणेशोत्सवातील अष्टमीपर्यंत पालखी तयार केली जाते. पितृ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पालखी राहुरीतून निघते. ही पालखी राहुरी, पारनेर व नगर तालुका फिरुन घटस्थापनेला हिंगणगावात येते. नंतर दुसऱ्या दिवशी नगर, भिंगार कँप तिसऱ्या माळेला बुऱ्हानगरच्या यात्रेदिवशी दुपारी १२ वाजेपासून ते सायंकाळी ५ पर्यंत पालखीच्या प्रदक्षिणा घातल्या जातात. या सोह्ळ्याला हजारो भक्त हजेरी लावतात.
पालखी उचलण्यासाठी पुढील बाजूस कापूरवाडी, वारूळवाडी, बुऱ्हानगर येथील लोक हजेरी लावतात. पाच-सहा तास पालखी खेळविली जाते. पालखीला सर्व अठरा पगड जातीचे लोक हात लावतात. ही प्रथा चारशे ते पाचशे वर्षापासून सुरु आहे. नागरदेवळे गावी पालखी गेल्यावर पुढच्या शिडीस सर्व हरीजन लोक धरतात व मागच्या शिडीस माळी व इतर समाज बांधव धरतात. भिंगार कॅपच्या हद्दीत पालखी गेल्यावर प्रथम ती हरीजन वस्तीवर नेण्यात येते. त्यानंतर भिंगार वेशीच्या आत ब्राम्हण गल्लीतून पालखीच्या ओट्यावर विसावते. दरम्यान त्याच वेळेस पलंग भिंगार मारुती मंदिरात येतो. त्यावेळी पलंग पालखीची भेट होते. भिंगारला मोठी यात्रा भरते.
तब्बल पाचशे वर्षाचा इतिहास प्राप्त असलेली पलंग पालखीची मिरवणूक आजही तुळजापुरकरांसाठी एक आनंददायी आणि सदाबहार सोहळा आहे. या पालखीचे मानकरी येथील पुजारी चंद्रकांत झाडपिडे यांच्या घरी आठ दिवस मुक्कमी असतात.

श्री क्षेत्र भगवानबाबा गड, पाथर्डी


भगवानबाबांचे पुर्वीचे नाव आबाजी तुबाजी सानप. सावरगाव घाट ता. पाटोदा, जि. बीड येथील ते मुळ रहिवासी होते. भगवानबाबांचा जन्म श्रावण वद्य पंचमी १८९६ साली झाला. भगवानबाबा लहानपणापासुनच अतिशय हुशार आणी चंचल होते. याच वयात त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत भगवानबाबा प्रथम दिंडीस गेले. पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिक महाराजांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले. माणिक महाराज हे त्यांचे प्रथम गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील बनकर स्वमी यांच्याकडे गेले त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. भगवानबाबांनी नारायणगडावर राहण्यांचा हट्ट धरला, तेव्हा माणिक महाराज म्हणाले मला काहितरी अनुग्रह दे म्हणुन भगवानबाबांनी  गडावरुन उडी मारली. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.
काही काळ उलटल्यानंतर तेथीलच वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी बाबांना त्रास देण्यास सुरुवात केली व नारायणगड सोडून जाण्यास भाग पाडले. या सर्व प्रकारानंतर  बाबांनी तपश्चर्येस हिमालयात जाण्याचे ठरवले. तेव्हा खरवंडीचे बाजीराव पाटलांनी भगवानबाबांना ढुम्यागडावर येण्यासाठी आग्रह करुन घेऊन गेले. भगवानबाबांनी आसपासच्या गावात जाऊन लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळविले व सदमार्गाला लावले.
१९५८ साली यशवंतराव चव्हाण यांनी भगवानबाबागडावर श्री विठ्ठलाच्या मुर्तीची स्थापना करुन भव्य दगडी मंदिरही बांधले. तसेच गडावर भगवान विद्यालयाची स्थापनाही केली. भगवानबाबांनी अनेक चमत्कार केले त्यातील एक म्हणजे त्यांनी पाण्यावर बसुन ज्ञानेश्वरी वाचली.
||बैसोनी पाण्यावर वाचली ज्ञानेश्वरी.||
भगवानबाबांचा मृत्यु पौष-पोर्णिमा १९६५ साली झाला. पंढरपुर, पैठण अशा बऱ्याच ठिकाणी बाबांचे मठ आहे.
भगवानबाबानंतर भीमसेन महाराज यांची दुसरे उत्तराधिकारी म्हणुन निवड झाली. त्यानी ४० वर्षे गडावर काढले. भगवानबाबांच्या चालिरिती पुढे जोपासल्या. ९ नोव्हेंबर २००३ रोजी भीमसेन महाराजांचा मृत्यु झाला. त्याच्यानंतर गडाचे तिसरे उत्तराधिकारी म्हणुन श्री डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांची निवड झाली व तेथुन पुढे गडाचा विकास वाढिस लागला. गडावर अनेक सुविधा झाल्या.
नामदेव महाराजांनी गडावर ज्ञानेश्वरी विद्यापिठाची स्थापना केली. नामदेव महाराज ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. गडातर्फे प्रत्येक गावात मासिक अन्नदान चालू आहे. हे सर्वकाम लोकवर्गणीतून होत आहे. येथे येण्याऱ्या भाविकांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाते. येथे श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट कार्यरत आहे.



श्री क्षेत्र काळ भैरवनाथ, आगडगाव


श्री शंकराच्या आज्ञेवरुन काळभैरव काशीवरुन सोनारीकडे निघाले. सोनारीला जाताना ते याच दंडकारण्यातून चालले होते. जाता जाता ते एका झाडाखाली बसले. त्या ठिकाणी (सध्याचे आगडगाव) काही गुराखी मुलं आपली गुरे चारत होती. दुपारी जेवणाची वेळ होती मुले आपापली शिदोरी सोडून जेवणास बसले. त्यातील एका मुक्या मुलाचे लक्ष श्री भैरवनाथांकडे गेले. त्यानी आपल्या मित्रांना हातवारे करुन सुचविले की नाथांना जेवणासाठी बोलवा, परंतु इतर मुलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या मुलाने आपली शिदोरी नाथांसमोर ठेवली व जेवणाचा आग्रह केला. नाथांनी त्या मुलांमध्ये जेवण केले. ते तृप्त होऊन मुलांवर प्रसन्न झाले व त्यास वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्या मुक्या मुलाला वाचा फुटली. तो अत्यानंदित होऊन बोलू लागला. या ठिकाणी पाणी नव्हते म्हणून नाथांनी तेथे त्रिशूल रोवला. तसा पाण्याचा उगम झाला मंदिराच्या जवळच असलेल्या या तलावावर त्रिशुलबा हे दैवत आहे.

देवाने आग्रह केल्यानंतर त्या मुक्या मुलाने वर मागितला, की कायम तुमचे दर्शन व्हावे म्हणून या ठिकाणी थांबावे. त्यानुसार नाथांनी तथास्तू म्हटले व याच गावात थांबेन असे वचन दिले तसेच मला जेवण मिळालेल्या या भूमीत जो अन्नदान करील, त्याचे दुःख नाहीशे होतील, येथे केलेले अन्नदान मी आनंदाने ग्रहण करील असा वर दिला. (ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन ट्रस्टने सध्या देवस्थानाजवळ बाजरीची भाकरी व आमटी असा महाप्रसाद सुरु केला आहे.)
त्यानंतर नाथांनी राक्षसांकडून एकाच रात्रीतून मंदिर बांधून घेतले. त्या राक्षसांनी मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना करुन गंगास्नान घातले. आगडमल, देवमल, रतडमल अशी या तीन राक्षसांची नावे आहेत. त्यांच्या नावांवरुनच आगडगाव, रतडगाव व देवगाव ही तीन गावे ऐकमेकांपासून प्रत्येकी ४ कि.मी अंतरावर वसलेली आहेत. (मंदिराच्या प्रथम दरवाजावर तीन दगडी राक्षसी मुंडके बसविलेले आहे ते या कथेची साक्ष देतात.) सध्या ही तीनही गावे अत्यंत डोंगराळ प्रदेशात असूनही समृध्द आहेत.

श्री भैरवनाथांना शंकराच्या आज्ञेवरुन पुढे सोनारीला जाऊन आपले कर्तव्य करावयाचे होते. ब्रह्मदेवाचा दैत्यांना वर होता, की अविवाहिताच्या हातून मृत्यू नसावा. त्यांच्या रक्ताच्या एका थेंबातून अनेक राक्षस निर्माण होतील, त्यामुळे भैरवनाथांना विवाह करणे आवश्यक होते. ठराविक घटकेत लग्न केले, तरच मी थांबेन, या अटीवर श्री भैरवनाथांचा विवाह आंबेजोगाई येथील जोगेश्वरी देवीशी ठरला; परंतु अटीप्रमाणे लग्न कोंबडा अरवण्यापूर्वी न झाल्याने ते पुढे निघून गेले. पुढे जोगेश्वरीने सोनारपासून तीन कि.मी अंतरावर असलेल्या मुख्याग्राम (मुगाव) येथे शेषाच्या पोटी योगिनीचा अवतार धारण केला व चैत्र वद्य अष्टमीस रात्री बारा वाजता श्री भैरवनाथांचा देवी योगेश्वरीशी (जोगेश्वरी) विवाह झाला. लग्नांनतर श्री भैरवनाथांनी दैत्यांचा संहार करण्यास सुरुवात केली. दैत्यांवर वार केल्यानंतर त्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षसांची निर्मिती होऊ लागली. त्यावेळी श्री भैरवनाथांनी शंकिनी, कंकनी, डंकिनी अशा चौषष्ट योगिणींची आराधना करुन घेतले. दैत्यांबरोबरच युध्दात या योगिणींनी आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले. दैत्यांबरोबरच युध्दत या योगिणींची दैत्यांचे रक्त जमिनीवर पडू न देता ते प्राषाण केले आणि नंतर श्री भैरवनाथांनी दैत्यांचा संहार केला. युध्द थांबल्यानंतर शस्त्र धुण्यास पाणी नव्हते म्हणून नाथांनी त्रिशुल रोवला व त्याठिकाणी पाणी निघाले. आजही ते स्थान लोहतीर्थ म्हणून ओळखले जाते. श्री भैरवनाथांनी राक्षसांचा नाश केला याचा आनंदोत्सव म्हणून सोनारी येथे चैत्र वद्य अष्टमीस सहा दिवसाची मोठी यात्रा भरते.
त्याचप्रमाणे श्री क्षेत्र आगडगाव येथे चैत्र शुध्द पौर्णिमेनंतर हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या रविवारी (तिसऱ्या दिवशी येणारा रविवार सोडून) मोठी यात्रा भरते.

भुतांची यात्रा
भूत म्हटलं, की माणसाच्या अंगाला शहारे फुटतात. पण भुताची यात्रा हे या गावचं मुख्य वैशिष्ट्य. अगदी पूर्वीपासूनची असलेली हि यात्रा पाहण्यासाठी माणसांनी जाऊ नये असे संकेत आहेत. मुख्य यात्रेच्या दुसऱ्या दिवशी (सोमवारी) रात्री १२ वाजता ही यात्रा भरते, असे सांगितले जाते. या दिवशी भैरवनाथ मंदिर पारिसरात कोणीही थांबत नाही. या यात्रेबाबत काही प्रसंग सांगितले जातात. कै. गोपीनाथ हनुमंत कर्पे हे आपली तेलाची घागर दीपमाळेजवळ विसरले. घागर विसरलो, हे त्यांच्या दुसऱ्या दिवशी लक्षात आले. मुख्य दरवाजा जवळ गेले असता त्यांना भयानक दृश्य दिसले. हातात टेंभे, अक्राळ-विक्राळ रुपे असलेली भुते आणि त्याचा नाच पाहून ते घामाघुम झाले. भेदरलेल्या स्वरात त्यांनी भैरवनाथांचा धावा केला त्यामुळे श्री कालभैरवनाथांनी त्यांना दर्शन देऊन त्यांची तेलाची घागर आणून दिली व भूताच्या यात्रेविषयी सांगितले. येथे भरत असलेल्या या यात्रेची कल्पना इतरांना देऊ नकोस असेही सांगितले. परंतु एखादी घटना माण्सांच्या मनात जास्त दिवस राहत नाही. त्याप्रमाणे गोपीनाथांच्या मनात ही गोष्ट जास्त दिवस राहिली नाही आणि त्यांनी घडलेला प्रकार सर्व सांगून टाकला. त्याच वेळी ते मरण पावले.

श्री क्षेत्र वृध्देश्वर



















श्री क्षेत्र वृध्देश्वर मंदीर हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर या गावी आहे . नगरहुन सुमारे ४० ते ४५ कि.मी. अंतरावर आहे. येथे जागृत शिव मंदीर आहे.
येथील शिवलींग स्वयंभु शिवलींग आहे, ते दरवर्षी महाशिवरात्रीला गव्हाच्या आकाराएवढे वाढते म्हणजेच वृध्दींगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते . “आदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य.” वृध्देश्वर हे नाथ सांप्रदायाचे आद्यपिठ म्हणुन ओळख आहे. आणि तसेच नवनाथ ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक २३ मध्ये याच ठिकाणी शंकर भगवान व पार्वती म्हातारयाचे रुप घेऊन पंगतीला वाढण्याचे काम केले म्हणुन त्यांना “म्हातारदेव” नावाने देखील ओळखले जाते व शंकर भगवान यांनी मी येथेच स्वयंभु परिपुर्ण राहील असे सांगीतले.
या शिवलिंगामधुन कायम गंगा वहाते.. येथे नाथांनी यज्ञ केलेला आहे. या यज्ञासाठी ३३ कोटी देव आले होते आणि हाच गर्भगिरी डोंगर गोरक्षनाथांनी सोन्याचा डोंगर केलेला आहे.
स्त्री राज्यातुन मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथांनी आणले, त्यावेळेस मैनावती राणीने दिलेली सोन्याची वीट असलेली झोळी मच्छिंद्रनाथाने लघवीचे निमित्त करुन गोरक्षनाथाकडे दिली त्यात ती सोन्याची वीट होती. गोरक्षनाथाने ती विट फेकुन दिली व त्यामध्ये त्याच आकाराचा दगड ठेवला. गर्भागिरीच्या डोंगरावर आल्यावर मच्छिंद्रनाथांनी झोळी मध्ये पाहिले तर दगड होता. त्यामुळे दोघांमध्ये भांडण सुरु झाले व गोरक्षनाथांनी गर्भागिरी डोंगर सोन्याच्या करुन दाखवला.
येथे महाशिवरात्र, श्रावणी तिसरा सोमवार या दिवशी पैठण वरुन पायी कावडीने पाणी आणले जाते. या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत असुन लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतात.
वृध्देश्वर या ठिकाणी आर्युवेदीक वनस्पती भरपुर प्रमाणात आढळतात येथे वनाविभागाने पर्यटन केंद्रही चालु केले आहे. मंदिरासभोवती मोर, वानर इ. प्राणि खुल्या वातावरणात पहावयास मिळतात. त्याचा भाविक आनंद लुटतात. श्रावण मासा निमित्ताने महिनाभर बेलआरती सायंकाळी ८ ते ९ या वेळेत होते. बेल आरतीची सांगता व देवाला शित लावणे हा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो आणी महाप्रसादाचा हजारो भाविक लाभ घेतात. येथे धार्मिक साप्ताहिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. हा परिसर फुलवेलींनी नटलेला आहे.
देवस्थान समितीने सुंदर कोरीवकाम असलेले राजस्थानी पध्द्तीचे प्रवेशव्दाराचे व ओवऱ्याचे काम हाती घेतले आहे. श्री वृध्देश्वर देवस्थान घाटशिरस ट्रस्ट अध्यक्ष सुधाकर शिवराम पालवे यांच्या अध्यक्षतेखाली  मंदिराचे व्यवस्थापन व इतर कामे सुनियोजित गतीने चालु आहेत.

मोहटादेवी

श्री क्षेत्र मोहटादेवी, पाथर्डी
श्री क्षेत्र मोहटादेवी, पाथर्डी पाथर्डी शहरापासून पुर्वेकडे 9 कि.मी. अंतरावर असणारे पुण्य पावन श्री क्षेत्र मोहटादेवी येथील देवता श्री कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी ही आई जगाची आई. श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे ।। सहास्त्र मुखाचा वर्णिता भागला ।। वेद जाणु गेला पुढे मौनावाला ।। या न्यायाने महती कितीही वर्णन करावी तेवढी थोडीच आहे. ती आईच आहे हीच तिची महती.

श्री भगवान वृद्धेश्वर (म्हातारदेव) आदीनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। श्री भगवान मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव, श्री भगवान कानीफनाथांची संजीवन समाधी मढी, (श्री क्षेत्र कानिफनाथ गड) अशा पुण्यपावन भुमीमध्ये फार फार वर्षापुर्वी श्री भगवान नवनातांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करुन भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. यज्ञाद भवती पर्जन्यो पर्जन्याद अन्न संभवः ।। श्री भगवान श्री कृष्ण उक्ती प्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्य धान्याची निर्मिती झाली. प्राण्याना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले आणि पूर्णाहूती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रगट झाली. तीच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता. श्री नवनाथाना तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आर्शीवचन दिले. त्यावेळी जगत उद्धारार्थ तु याच ठिकाणी रहावे अशी आईस प्रार्थना केली तेव्हा पुढे कार्य आहे हे जाणून योग्यवेळी मी येथे पुन्हा प्रगट होऊन येथेच राहील असे आर्शिवचन दिले.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थान मधर्मस्य संभवामी युगे युगे ।। या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे या नुसार मोहटा गांवच्या दहिफळे बन्सी, हरी गोपाळ, आदिच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ श्री रेणुकामाता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली व श्री मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली. तिच्या नावे श्री क्षेत्र मोहटादेवीगड प्रसिद्ध झाला.

धार्मिक उत्सव
मासीक उत्सव - दर पौर्णिमेस महाभिषेक पुजा, रात्री, 8 ते 9 अन्नदान 9 ते 11 किर्तन, 11 ते पहाटे 4 हरीजागर.

वार्षिक उत्सव – चैत्र शु. प्रतिपदा ते रामनवमी – वा नवरात्रोत्सव श्रीराम जन्मोत्सव. श्रावण वद्य 8 श्री कृष्ण जन्मोत्सव भाद्रपद 4 ते 40 श्री गणेशोत्सव आश्विन शु. 1 ते 9 शारदीय नवरात्रोत्सव आश्विन शु. 11 प्रगट दिन आनंदोत्सव कार्तिक शु. 1 मोहटागावामध्ये चांदीच्या मुखवटा पुजन दर्शन सोहळा. 7) मार्गशिर्ष शु. 15 दत्तजन्मोत्सव 8) पौष शु. 7 ते 15 शाकंभरी नवरात्रोत्सव 9) माघ वद्य 30 महाशिवरात्र 10) फाल्गुन शु. 15 होळी पुजन 11) चैत्र शु. 15 श्री हनुमान जन्मोत्सव

शारदीय नवरात्र महोत्सवातील कार्यक्रम आश्विन शु. प्रतिपदा श्री मोहटादेवी मुखवटाची सुवर्ण अलंकारासह मोहटे गावांपासून श्री क्षेत्र मोहटादेवी गडापर्यंत सवाद्य मिरणवूक श्री मोहटादेवीची महापुजा अभिषेक व घटस्थापना, श्री सप्तशती पाठ वाचनास प्रारंभ.

आश्विन शु. 9 होम हवन, कुष्मांड बलीदान पुर्णाहुती

आश्विन शु. प्रतिपदा ते महानवमी पर्यंत नित्य अखंड हरीनाम सप्ताह, काकडआरती भजन रात्रौ 9 ते 11 हरीकिर्तन श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, जागण गोंधळी आराधी यांची गाणी. विजयादशमी – श्री क्षेत्र पैठण, त्र्यंबकेश्वर आदि तिर्थाचे देवीस स्नान (कावडीचे पाणी) सिमोलंघन शमीपुजजन

एकादशी – प्रगटदिनोत्सव छबीना मोहटेगावापासून देवीगडापर्यंत पालखीची सवाद्य मिरवणूक दर्शनसोहळा रात्रौ 8 ते प. 3 आश्विन 12 नामांकित मल्लांचा चंगी हंगामा. बलिप्रतिपदा (पाडवा) मोहटे गावात श्री मोहटादेवीचा मुखवटा दर्शन सोहळा

कानिफ़नाथ समाधी स्थळ, मढी

श्री क्षेत्र मढी (कानिफ़नाथ समाधी स्थळ), मढी, पाथर्डी
गर्भगिरीच्या पर्वतावर घाटशिरुर नजीक एका दरीमध्ये श्री आदिनाथ हे वृध्देश्वराच्या रुपाने वास्तव्य करीत आहे. वृध्देश्वराच्या पुर्वेकडे ५ कि.मी. अंतरावर सावरगाव नजीक श्री मच्छिंद्रनाथाच्या उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ हे विराजमान झाले आहे.
श्री नऊनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रुपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुध्द नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले.
कानिफनाथांनी प्रर्दीर्घ काळ नाथसंप्रदायाचे काम केले. धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले. नाथ पंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्हातील मढी या गावी फाल्गुन वद्य(रंगपंचंमी) च्या दिवशी संजीवनी समाधी घेतली. कानिफनाथ मंदिर एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे. राणी येसूबाई आणि बाळराजे शाहुमहाराज(पहिले) जेव्हा मोगलांच्या वेढ्यामध्ये होते. तेव्हा राणी येसूबाईंनी श्री कानिफनाथस नवस केला होता कि, जर माझ्या शाहुमहाराजांची सुटका पाच दिवसाच्या आत झाली तर मी कानिफनाथ गडाच्या सभा मंडप, नगारखाना इ. बांधकाम तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करीन. भक्तांनी दिलेली हाक कानिफनाथांनी ऐकली आणि पाच दिवसांच्या आतमध्ये कानिफनाथाने राणी येसुबाई आणि युवराज शाहुराजे(पहिले) यांची सुखरुप सुटका केली. तेव्हा हा नवस फेडण्यासाठी राणी येसूबाई आणि शाहुराजे (पहिले) यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार श्री पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत यास मढी येथे पाठवून त्याठिकाणी प्रचंड असे प्रवेशद्वार, नगारखना, सभामंडप, पाण्यासाठी गौतमी बारव इ. भव्य बांधकाम केले तसेच चैतन्य कानिफनाथाच्या समाधीवर वैदीक पध्द्तीने पूजा व्हावी म्हणून तसेच फाल्गुन वद्य ५ (रंगपंचमी) या दिवशी भरणांच्या यात्रेची सर्व व्यवस्था पहवी म्हणून छ्त्रपती शाहू महाराजांनी वेद्शास्त्र संपन्न ब्राम्हण श्री गंगाराम दिक्षित उपनान चौधरी काशीकर (वास्तव्य पैठण) यांना इ.स. १७४३ मध्ये सनद दिली या अस्सल ऐतिहासिक पुराव्यावरुन वैदिक पुजेची परंपरा मराठे राजे नाथांच्या समाधीच्या ठिकाणी ठेवीत. समाधी मंदिरातील पितळी घोडा व सदोदीत तेवणारा नंदादीप सुप्रसिध्द मराठे सरदार कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा बापुराव आंग्रे यांनी अर्पण केलेला आहे. अशाप्रकारे श्री चैतन्य कानिफनाथ गडाचे ऐतिहासीक महत्त्व प्राप्त झाले.
श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे. नंतर सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे. तेथे नाथ विश्रांती करत. समोरच एक होमकुंड आहे नंतर नाथांच्या गादीघराशेजारीच पूर्वेला श्री भगवान विष्णूचे मंदिर आहे. त्यातील भगवान विष्णूची मूर्ती इतरत्र कोठेही पहावयास मिळत नाही. इतके अप्रतिम लावण्य त्या मूर्तीमध्ये आहे जणू काही श्री मोहनीराजच तेथे अवतरल्यासारखे वाटते. मंदिराशेजारीच श्री हनुमंतरायाची मुर्ती आहे. ती मुर्ती पाहुन भक्तांनी प्रभुकार्य करण्यासाठी सदोदित दक्ष राहिले पाहिजे असा संदेश हनुमंतरायांची मूर्ती देते. नंतर समाधी मंदिराच्या दक्षिणेला नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू श्री मच्छिंद्र्नाथ यांचे मंदिर आहे. तेथून सरळ पाहिले असता गर्भगिरी पर्वतावरील मच्छिंद्र्नाथाच्या मंदिराचे दर्शन भक्तांना मिळते. समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल-रखूमाईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधना मंदिर आहे. जेथे जाण्याकरीता भुयार आहे व तो एक पूर्वीच्या स्थापत्यशात्राचा आदर्श नमूना आहे. त्या साधना मंदिरामध्ये शिवलिंग व नंदी आहे व तेथे असलेल्या खिडकीमधून गार हवा येते व गावाची पश्मिमेकडील पाहणी करता येते. विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथाचे मंदिर व पारायण ठिकाण आहे. समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानीमातेचे मंदिर असून तेथे डाळींबीचे झाड आहे. त्याला भक्त जणांनी पूर्वी नाथभक्त होऊन गेलेल्या डाळीबाईच्या नावाने संबोधतात व त्या डाळींबीच्या झाडाला भक्त काही तरी संकल्प नवस करुन नाडा(धागा) बांधतात व श्री कानिफनाथ आजही त्या नवसाला पावून भक्तजणांच्या व्यथांचे निर्दालन करतात. श्री समाधी मंदिरामध्ये श्री नाथांची संजीवन समाधी असून, श्री कानिफनाथांची मनमोहक अशी संगमरवरी दगडाची मुर्ती तसेच नाथांचे वाहन असलेला व कान्होजी आंग्रेनी दिलेला पितळी घोडा व दत्तत्रयाची मुर्ती आहे. तसेच गडावर नगारखाना, बारदारी, भव्य सभा मंडप, पाण्याची टाकी तसेच श्री समाधी मंदिरावरील असलेला प्रचंड कळस व त्यावरील भगवान शंकराचा त्रिशूल हे मुख्य आकर्षण आहे. याच त्रिशूलाला भक्तगण यात्रेमध्ये काठ्या लावून आनंद उपभोगतात. मढी गावामध्ये हनुमंतरायाचे मंदिर अतिशय प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे श्री भैरवनाथ, श्री दत्त यांचे मंदिरदेखील भक्तांना पावणारी आहे. मढी गावाच्या पूर्वेकडून श्री पवनगिरी नदी वाहत आहे. तेथे नाथ भक्त आवर्जुन भेट देतात. नाथ मंदिराच्या दक्षिणेला एक मोठा पाझर तलाव आहे. त्या तलावाला अर्धी भिंत ही नैसर्गिक आहे. त्या भिंतीवर श्री आदिमाया तुळजापुरची भवानी माता यांचे मंदिर असून तेथे त्यांचे वास्तव्य आहे. या मंदिराच्या उत्तरेला श्री मच्छिंद्रनाथांचे छोटेसे मंदिर आहे. त्याला "लहान मायबा" या नावाने संबोधतात त्याच प्रमाणे गावाच्या दक्षिणेला गर्भगिरी पर्वताच्या रांगा आहेत. त्यांमध्ये एक दर्या आहे. त्याला लेण्यार्दच्या दरा म्हणतात. लेण्यार्दच्या दर्याशेजारीच दुसऱ्या दऱ्यामध्ये एक प्रचंड अशी दगडाची गोटी असून तेथे गावकऱ्यांतर्फे प्रत्येक वर्षी गोवर्धन पुजा होते. तसेच या दर्यामध्ये एक ३ ते ४ मीटर खोलीचा गोसाव्यांचा झरा आहे. या झ्ऱ्याचे वैशिष्ट्ये असे आहे की हा झरा कितीही दुष्काळ पडला तरी याचे पाणी आटत नाही किंवा कमी होत नाही. परिसरातील गर्भगिरी पर्वत हा श्रावण महिन्यामध्ये पाहाण्याजोगा असतो. तसेच मढी गावामध्ये दोन छोट्या व एक मोठी बारव आहे.
फ़ाल्गुन वद्य पंचमीला (रंगपंचमील) मढीला कानिफनाथांची यात्रा भरते. या यात्रेला साधारणतः १० ते २० लाख भाविक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आदी प्रांतांमधून येतात. अठरा पगड जातीचे मढी हे पंढरपूर आहे. तेथे त्यांच्या भांडणाचा न्यायनिवाडा होतो. पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीचे गाढवाचा बाजार भरतो. मढीची रेवडी तर प्रयेकाची आवडीची आहे. पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात व धन्य होतात.
अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडूंगे हे गाव ४२ कि.मी. आहे. तेथून ३ कि.मी. अंतरावर मढी हे गाव आहे. पाथर्डीहून मढी हे गाव १२ कि.मी अंतरावर आहे. मढीपासून श्री मच्छिंद्रनाथ ६ कि.मी., वृध्देश्वर १२ कि.मी. व श्री मोहटा देवी २० कि.मी. अंतरावर आहे. दररोज नगर आणि पाथर्डी बसस्थानकामधून मढीकरिता बसेस आहे. अमावस्या, पौर्णिमेच्या वेळेस जादा बसेसची सोय आहे. त्याप्रमाणे यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बस स्थानकांमधून एस.टी. बसेसची सोय केली जाते.
नाथ भक्तांची व्यवस्था करण्याकरिता कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी रुमची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे. त्याचप्रमाणे भाविकांची व्यवस्था, सेवा करण्यासाठी कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी सदोदीत वाट पाहत आहे.

साई बाबा

श्री क्षेत्र शिर्डी (साईबाबा) मंदीर, शिर्डी
साईबाबा  हे 'शिर्डीचे साईबाबा' म्हणून सर्व जगाला ज्ञात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे धार्मिक स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाईत बसत व नंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते.
बाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी देश विदेशातील लोक येथे येतात अलैकीक शक्ति प्राप्त असलेले श्री साईबाबा शिर्डीत आले आणि जवळ जवळ ६० वर्षे त्यांनी आपल्या मानवी देहातील श्वानकार्य पूर्ण केले व तेथेच समाधिस्त झाले. साईबाबांनी आपल्या श्वान कार्यात आपल्या भक्तांना आश्वासन दिले होते कि, देहत्यागा नंतर माझी हाडे समाधितून बोलतील व या ठिकाणी माणसांची रिघ लागेल. याचा प्रत्यय आजही येतो आहे. येथूनच बाबांनी सर्व जगाला श्रध्दा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.
मंगळवारी दसर्‍याच्या दिवशी १९ ऑक्टोबर  इ.स. १९१९ रोजी साईबाबानी समाधी घेतली.
साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आलेअसून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.
साईबाबा शिर्डीत आल्यानंतर आपली जात कधीही कुणाला सांगितली नाही. साईबाबा पुढे सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षपणाची शिकवण दिली.
'सबका मालीक एक' हे साईचे बोल होते. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र जगाला दिला.
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेनेयेण्यासाठी शिर्डीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कोपरगाव येथे उतरता येते. बहुतेक गाड्या थांबत असल्याने ८३ किलोमीटर अंतरावरचे मनमाड हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० कि.मी. आहे. तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबादाहून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे. 

श्री क्षेत्र शनी शिंगणापूर, शिंगणापूर


अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीजवळ वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे मंदिर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते.
येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही, असेही सांगितले जाते. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनिदेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात.

येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.